Nisarga Mitra Mandal Aurangabad

Tuesday, 26 May 2026

Wilderness Unveiled: My Unforgettable Safari Through Pench and Umred Karhandla -Kishor Gathadi

There is a unique magic to the dry deciduous forests of Central India. The air smells of dust and dry leaves, the canopy echoes with warning calls, and every turn of the safari track holds the promise of an unforgettable encounter. Last week, I set out to explore two incredible wildlife havens: Pench Tiger Reserve and the Umred Karhandla Wildlife Sanctuary.

​The journey left me with a memory card full of incredible frames and a heart full of stories. Here is a glimpse of the wilderness through my lens.

​The King of Central India: A Thrilling Encounter in Umred 

​You can go on a hundred safaris, but the adrenaline rush of spotting a Royal Bengal Tigers never changes. We were incredibly fortunate to cross paths with this magnificent predator.

​Watching this apex predator sit calmly by the track, completely unbothered by our presence, was a masterclass in raw power and grace. Moments later, the tiger stood up and walked confidently down the path, offering us a spectacular view.

​[

​The sheer thrill reached its peak when the tiger crossed the road right between the safari gypsies, leaving every single person in the vehicle completely breathless.


​Sentinels of the Grasslands and Woods

​While the big cats always steal the spotlight, the true essence of the jungle lies in its diverse herbivore population. Each species has adapted beautifully to its environment.

​In the open, golden grasslands, we spotted a majestic Nilgai (Blue Bull) standing tall against the shimmering yellow grass.

​Deep inside the denser teak forested patches, the elusive Sambar Deer made an appearance. Camouflaged perfectly against the brown leaf litter, this magnificent stag stood frozen, watching our movements with intense, alert eyes.

​Wonders of the Canopy: Avian Treasures

​As a passionate birdwatcher, no safari is complete without keeping my eyes trained on the treetops. The avian diversity during this trip was absolutely spectacular.

​Perched high on a stark, bare branch against the clear sky, we encountered a magnificent Oriental Honey Buzzard. The raptor sat with absolute poise, scanning the forest floor below for its next meal.

​Adding a vibrant splash of color to our journey was the state bird of Maharashtra—the Yellow-footed Green Pigeon. Spotting it feeding quietly amidst the green foliage was the perfect finale to an incredible wildlife expedition.

​Final Thoughts

​This expedition to Pench and Umred was a gentle reminder of how beautifully balanced nature is when left undisturbed. From the floor of the forest to the highest canopy, life thrives in every corner.

​If you are planning your next wilderness getaway, Central India's forests should undoubtedly be at the top of your list.

 

Have you ever visited Pench or Umred? Which of these frames is your favorite? Let me know in the comments below!

Friday, 2 June 2023

वृक्षारोपण

 जागतिक पर्यावरणबातमी करिता...


जागतिक पर्यावरण दिना निमित्य निसर्ग मित्र मंडळा तर्फे वृक्षारोपण 


जागतिक पर्यावरण दिनानिमित्य रविवार दिनांक 4 जून रोजी सकाळी ठीक साडे सात वाजता, निसर्ग मित्र मंडळा तर्फे 

आरंभ स्वमग्न व गतीमंद मुलांची संस्था ,छत्रपती संभाजी नगर हनमंत गाव, वाळुज येथे वृक्षारोपण आयोजित करण्यात आले आहे.

येथील आरंभ स्वमग्न व गतीमंद मुलांची संस्था,सामाजिक वनीकरण विभाग व इंडियन रेडक्रॉस सोसायटी याच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्याया वृक्षरोपणात

विविध फळ,फुले देणारी तसेच पक्षांना आकर्षित करणारी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.

वरील उपक्रमात सर्व निसर्गप्रेमीनी सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजका मार्फत करण्यात येत आहे. 

आपल्या तर्फे लावलेला एक वृक्ष भविष्यात मुलांना मायेची सावली देत राहिल.


किशोर गठडी

सचिव

निसर्ग मित्र मंडळ

Sunday, 19 March 2023

Sparrow Day:A Call to Action for Saving a Disappearing Species. -Kishor Gathadi

Sparrow Day:A Call to Action for Saving a Disappearing Species


Every year on March 20th, people around the world celebrate Sparrow Day to raise awareness about the declining population of sparrows and the urgent need to protect these little birds. Once a common sight in gardens and parks, sparrows are now disappearing at an alarming rate due to various human activities and environmental factors.


The Extinction of Sparrows: Reasons and Latest Data


According to recent studies, the sparrow population in India has declined by over 80% in the past two decades, and the trend is continuing. The reasons for the decline are manifold and complex, including:


 Loss of habitat: As urbanization and infrastructure development continue to expand, sparrows are losing their natural habitats, nesting sites, and food sources. The use of pesticides and insecticides in agriculture and gardens is also reducing the availability of insects that sparrows feed on.


 Pollution: Air and water pollution are affecting the health and breeding of sparrows, making them more vulnerable to diseases and environmental stress.


 Climate change:Changing weather patterns, extreme temperatures, and natural disasters are disrupting the sparrow's breeding and migration patterns, leading to a decline in their population.


Sparrows in Nature Conservation.

Sparrows play an important role in nature conservation and the natural cycle. As seed-eating birds, they help to disperse seeds of plants, contributing to the growth and diversity of vegetation. Sparrows also serve as prey for larger predators, playing a role in the food chain and maintaining balance in the ecosystem.


In addition, the presence of sparrows can indicate the health of an ecosystem. Declining sparrow populations can signal environmental changes, such as pollution or loss of habitat. Therefore, conserving sparrow populations is important for monitoring the health of the environment.


Sparrows also have cultural significance and are beloved by many people around the world. Their songs and cheerful chirping are a welcome sound in gardens and parks, bringing joy to those who hear them.


Overall, the role of sparrows in nature conservation and the natural cycle cannot be overstated. Protecting their populations and ensuring their continued presence in the environment is essential for the health and well-being of our planet.


 How to Restore the Population of Sparrows in Aurangabad and Beyond


While the plight of sparrows is a global concern, we can start taking action at the local level to help restore their population. Here are some simple steps that individuals and communities can take to make a difference:


Create a sparrow-friendly habitat: Plant native trees, shrubs, and flowers that provide shelter, nesting sites, and food for sparrows. Avoid using pesticides and chemicals in gardens and farms, as they can harm the birds and their food sources.


 Provide nesting boxes: You can make or buy sparrow nesting boxes and install them in your garden or balcony. These boxes provide safe and secure places for sparrows to breed and raise their young.


 Spread awareness:Educate your friends, family, and community about the importance of sparrows and the threats they face. You can organize events, workshops, and campaigns to raise awareness and promote conservation.


 Support conservation efforts:There are many NGOs and organizations working to protect sparrows and their habitats. You can donate to these organizations or volunteer your time and skills to support their initiatives.


 Conclusion

Sparrows are more than just cute little birds. They play a crucial role in maintaining the ecological balance and biodiversity of our planet. Saving sparrows requires collective action and a long-term commitment from individuals, governments, and communities. On this Sparrow Day, let's pledge to do our part in conserving these feathered friends and ensuring a sustainable future for all.


Kishor Gathadi

Secretary

Nisarga mitra mandal

kishorgathadi@gmail.com

20 मार्च जागतिक चिमणी दिवस #निसर्ग मित्र मंडळ #किशोर गठडी

 चिमणी (House sparrowIII)

शास्त्रीय नाव :सिकोनिया सिकोनिया

(Passer domesticus)

कुळ(Passeridae)


‘अतिपरिचयात अवज्ञा’ म्हणजे नेहमी दिसणा-या गोष्टींचे खरे महत्त्व जाणवत नाही.असा त्याचा साधारण अर्थ आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या चिमण्यांची संख्या कमी होणे हे त्याचे एक उदाहरण ! वाढत्या प्रदुषणामुळेच चिमण्यांची संख्या कमी झाली, हे खरेतर विनाशाचेच प्रतीक आहे.

जगभरातील लोककथा आणि ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ सारख्या बडबडगीतांमध्ये सर्वत्र आढळणारी चिवचिव चिमणी गेली कुठे? असा प्रश्न जगभरातील पर्यावरणप्रेमींना पडू लागला. कारखान्यातल्या चिमणीचे भकभक धूर ओकणे प्रमाणाबाहेर वाढले आणि अंगणातली चिमणी दिशेनाशी होऊ लागली. पुढच्या पिढीला चिमणी फक्त चित्रांमध्येच दिसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, २०१० सालापासून हा ‘वर्ल्ड स्पॅरो डे’ साजरा केला जाऊ लागला आहे.हा दिवस त्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साजरा केला जातो. वीज, मोबाईलमधुन येणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे चिमणीच्या आणि इतर पक्षी यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.

भारतात सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणून चिमणी (नर- चिमणा, मादी-चिमणी) परिचयाची आहे. नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रेषा असतात. मादी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रंगाची असते.तीला भारतात तपकीर असेही म्हटले जाते.

 हा पक्षी हिमालयाच्या २००० मी. उंचीपर्यंत, तसेच भारतभर सर्वत्र आढळतो . तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमारसह इतरही देशांत आढळतो. भारतात काश्मिरी आणि वायव्यी अशा हिच्या किमान दोन उपजातीही आढळतात.


माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न, सुर्यफुलाच्या बिया असे सर्व प्रकारचे खाद्य खातो. विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा पक्षी अशी ओळखही या पक्ष्याची आहे. गवत, कापूस, पिसे, मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या मागे, झाडांवर असे कुठेही घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची, त्यावर तपकिरी ठिपके असलेली ४ ते ५ अंडी देते. अंड्यांच्या रंगात स्थानिक बदलही आहेत. नर-मादी घरटे बांधण्यापासून, अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात. चिमण्यांचे आयुष्य सहा महिने ते तीन वर्षांपर्यंत असते.

भारतात चिमण्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक कृषी संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार केरळ गुजरात आणि राजस्थानमध्ये चिमण्यांची संख्या 20 टक्क्यांनी घटली आंध्र तेलंगाना चिमण्यांचे प्रमाण 80 टक्के घटले आह. किनारपट्टी भागात याचे प्रमाण 70 ते 80 टक्क्यांनी खाली आले आहे .

अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षांची तोड खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे.परिणामी चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. विशेषत: शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत् चुंबकीय उत्सर्जन, आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता, अन्नाची अनुपलब्धता, शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर यांसारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.

चिमण्या हरवत आहेत. आपल्या परिसरातील चिमण्या दिसायच्या बंद झाल्या आहेत. चिमण्या अदृश्य होण्याची अनेक कारणे आहेत. चिमण्यांना मिळणारे अन्नकण कमी झाले आहेत. पूर्वी इतस्तत पडलेले धान्य निवांतपणे टिपायला चिमण्या यायच्या. आता इतस्तत: पडलेले अन्नकण कमी झाले आहेत आणि निवांत टिपायला घराला अंगण राहिले नाही. चिमण्यांना मिळणाऱ्या अन्नकणांत म्हणजे टिपायच्या दाण्यांमध्ये प्रिझव्‍‌र्हेटिव्ह व विष इतके असते की कित्येक चिमण्या ते  खाऊन मृत्युमुखी पडल्या आहेत. चिमण्या झुरळ व इतर उपद्रवी कीटकही खातात, परंतु आज या सर्व कीटकांना विष घालून मारले जाते. मग ते खाऊन चिमण्यांना मरावे लागते.

आपण बांधलेल्या सिमेंटच्या इमारतीमध्ये चिमण्यांना घरटे बांधायला जागा नाही. जागा असेल तरी घरटे बांधायचे साहित्य चिमण्यांना परिसरात उपलब्ध नाही. त्यामुळे बेघर होणाऱ्या चिमण्यांना मदत करण्यासाठी भूतदयेने किंवा पर्यावरणीय पक्षीप्रेमातून आपण ही घरटी विकत घेऊन किंवा स्वतः तयार आपल्या घराच्या दर्शनी भागावर लावून आपले पर्यावरणप्रेम जाहीर करत असतो परंतू याचा उपयोग सहसा होत नाही

चिमणीसारख्या पक्ष्यांच्या जीवनक्रमात जन्म- जीवनसंघर्ष – पुनरुत्पादन हे सर्व नैसर्गिकप्रशिक्षण असते. त्यांना आपल्या अन्नाकरिता परिश्रम करावे लागतात. त्यांना हे अन्न सहज मिळू लागले तर तो संघर्ष चिमणी विसरेल. सकाळी उठून इतस्तत: उडून आपल्याला आवश्यक अन्न मिळवणे हे त्यांचे जीवनकार्य आहे.

जीवनसंघर्षांत चिमण्यांना योग्य अन्न शोधायची कला शिकावी लागेल. तसेच पर्यायी घरटय़ाचे साहित्य शोधावे लागेल. घरटय़ाच्या रचनेत बदल होईल, कदाचित अजून काही वेगळा बदल होईल. पण सर्वस्वी तो बदल त्या पक्ष्यांच्या अंतप्रेरणेतून होईल. आणि तो बदल शाश्वत असेल. आपण कृत्रिम घरटे पुरवून त्यांना अनैसर्गिकपर्याय पुरवत आहोत.



किशोर गठडी

सचिव निसर्ग मित्र मंडळ

Wednesday, 9 November 2022

औरंगाबाद च्या माळरानावर निसर्ग मित्र मंडळाला आढळला दुर्मिळ इजिप्सियन गिधाड पक्षी (Egyptian vulture)

 औरंगाबाद च्या माळरानावर आढळला दुर्मिळ इजिप्सियन गिधाड पक्षी  (Egyptian vulture)

औरंगाबाद दिनांक ०८ नोव्हेंबर २०२२ 





औरंगाबाद  येथील निसर्ग मित्रमंडळ व महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना  यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होत असलेला पक्षी सप्ताह २०२२ या अंतर्गत औरंगाबाद  येथील निसर्ग मित्रमंडळ या संस्थेने दिनांक ०८ नोव्हेंबर २०२२ रोजी माळरानावरील पक्षी निरीक्षण तसेच ई-बर्ड अँप प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली हा उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद  या ठिकाणी असलेल्या गोगाबाबा टेकडी परिसरात घेण्यात आला 

औरंगाबाद  येथील निसर्ग मित्रमंडळ या संस्थेचे सभासद व शहरातील पक्षीपेमी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती होते 

दुपारी ०३.३० वाजता पक्षी निरीक्षणास सुरवात झाली निसर्ग मित्र मंडळाचे सचिव व पक्षी मित्र संघटनेचे श्री किशोर गठडी यांनी पक्षी सप्ताह २०२२ बद्दल माहिती दिली तसेच पक्षी निरीक्षण, पक्ष्यांची ओळख व त्यांच्या नोंदी कश्या घ्याव्या याची माहिती दिली याच बरोबर पक्षी अभ्यासक श्री. किरण परदेशी यांनी ई-बर्ड या पक्ष्यांच्या विषयी काम करणाऱ्या अँप विषयी माहिती व प्रशिक्षण दिले त्यानंतर प्रत्यक्ष पक्षी निरीक्षणास सुरवात झाली. पक्षी निरीक्षणासाठी शहरातील अनेक अबाल वुद्ध निसर्ग प्रेमी उपस्थित होते. दुर्बिणीचा वापर करून पक्षी निरीक्षण करण्यात आले. पक्षी निरीक्षण दरम्यान पक्षी अभ्यासक श्री. किरण परदेशी यांना अचानक दुर्मिळ इजिप्सियन गिधाड पक्षी  (Egyptian vulture) माळरानावर आकाशात घिरट्या घालताना आढळले. श्री. किरण परदेशी यांनी तात्काळ हि गोष्ट जेष्ठ पक्षी अभ्यासक श्री. किशोर गठडी याच्या कानावर घातली. पक्षी अभ्यासक व वन्यजीव छायाचित्रकार श्री .विलास सवडे यांनी त्यांच्या कॅमऱ्यामधून या दुर्मिळ इजिप्सियन गिधाड पक्षी  (Egyptian vulture) चा छायाचित्रे घेण्याचा पर्यंत केला आणि एक दोन अस्पष्ट असे छायाचित्रे त्यांना मिळाले. हे गिधाड अत्यंत वेगाने उंच आकाशात घिरट्या घालत उडून दूर निघून गेले. 

या संदर्भात अधिक माहिती देतांना श्री किशोर गठडी व किरण परदेशी यांनी सांगितले की पांढरे गिधाड किंवा इजिप्तशियन गिधाड (इंग्रजी: Egyptian Vulture; इजिप्शियन व्हल्चर) हे निओफ्रॉन जातकुळीतील एकमेव गिधाड आहे. ते दक्षिण यूरोप, आफ्रिका आणि आशियात आढळते.

याचा आकार सुमारे घारीएवढा असतो. पूर्ण वाढ झालेल्या नर गिधाडांची लांबी ४७-५२ सेंमी तर मादींची लांबी ५२-५५.५ सेंमी असते. पंखांची लांबी शरीराच्या लांबीच्या २.७ पट असते. सगळे शरीर मळकट पांढऱ्या रंगाचे असते; डोके पिवळे असून त्यावर पिसे नसतात; चोच पिवळी; उडण्याच्या कामी उपयोगी पडणारी पिसे काळी असतात; शेपटी पाचरीसारखी; पंख लांब व टोकदार असतात. नर व मादी दिसायला सारखीच असतात. हे पक्षी एक एकटे किंवा जोडप्याने राहतात.

या पक्षी निरीक्षणात खालील पक्षी प्रजातीची नोंद ई-बर्ड अँप वर घेण्यात आली या नोंदी नवोदित पक्षी निरीक्षकांनी नोंदविल्या आहेत 

१) Grey Francolin (राखी तितर)

२) Spotted Dove (होला)

३) Greater Coucal(भारद्वाज)

४) Indian Nightjar(रातवा)

५) Little Swift (Indian House Swift)(पकोळी)

६) Painted Stork(रंगीत करकोचा)

७) Egyptian Vulture (गिधाड)

८) White-throated Kingfisher (खंड्या)

९) Black Drongo(कोतवाल)

१०) Bay-backed Shrike (खाटीक)

११) Rufous Treepie (टका चोर)

१२) Red-vented Bulbul (बुलबुल)

१३) Jungle Babbler (सातभाई)

१४) Indian Robin(दयाळ)

१५) Baya Weaver (सुगरण)

१६) Bee-eater (वेडा राघू)

या संपूर्ण उपक्रमासाठी निसर्ग मित्रमंडळ औरंगाबादचे श्री. नागेश देशपांडे श्री. महेंद्र देशमुख श्री. विलास सवडे श्री. प्रकाश ठाकूर इत्यादींनी परिश्रम घेतले 

या उपक्रमास शहरातील भीमराज सातदिवे ,योगेश्वरी पुजारी, प्रज्ञा राणा,ईशानी राणा ,सुभाष पुजारी,मिहिका पुजारी बंडू पुजारी, उमा कुलकर्णी ,वैभव देवकर,ज्योती नांदेकर , सुधीर कोर्टीकर, तेजल कोर्टीकर पक्षी प्रेमींची उपस्थिती होती

Sunday, 21 August 2022

निसर्ग मित्र मंडळ आयोजित शाडूमाती गणपती मुर्ती कार्यशाळेला चांगला प्रतिसाद


निसर्ग मित्र मंडळ आयोजित शाडूमाती गणपती मुर्ती  कार्यशाळेला चांगला प्रतिसाद








येथील निसर्ग मित्रमंडळ तसेच जायसवाल महिला संघटन या संस्थेच्या सहकार्याने रविवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी जयसवाल भवन रचनाकार कॉलोनी येथे शाडू माती गणपती मूर्ती तयार करण्यासाठीची कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला महिला व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

सुरवातीला जायसवाल महीला संघटन औरंगाबादच्या अध्यक्षा अर्चना उदय जायसवाल यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले

या प्रसंगी मंडळाचे सचिव किशोर गठडी यांनी शाडूच्या मूर्ती नदीत किंवा विहिरीत विसर्जित करू नका तर ते आपल्या घरीच मूर्तीचे विसर्जन करा असे आवाहन केले त्याच प्रमाणे अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश हा नागरिकानमधे निसर्ग संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी हा असून निसर्ग मित्रमंडळा तर्फे  दर वर्षी  प्रदूषण मुक्त  गणेशोत्सव हा उपक्रम गेल्या 20 वर्षा पासून सातत्याने राबविला जातो असे ही त्यांनी नमूद केले.


अशा उपक्रमाद्वारे प्रामुख्याने नागरिकांमध्ये प्रदूषण मुक्त गणेशोत्सव  संदर्भातील जनजागरण,प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती ला पर्यायी पर्यावरणपूरक मूर्ती साठी चे उद्बोधन; तसेच विसर्जनाच्या दिवशी शहरातील विविध संघटनांच्या मदतीने निर्माल्य संकलन आदी उपक्रम घेतले जातात.

या कार्यशाळेत प्रामुख्याने सौ श्रद्धा गाजरे यांनी सहभागीना गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निसर्ग मित्र मंडळाचे नागेश देशपांडे

तसेच जायसवाल महीला संघटन औरंगाबादच्या अध्यक्षा अर्चना उदय जायसवाल,सचीव रितु शैलेंद्र,दिपाली आनंद ,आशीमा संजय ,सरीता आशीषराज,प्रिती मनीषराज,तृप्ती राहूल,काजल अभिषेक इत्यादी जायसवाल महीला संघटन सदस्य

आदींनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजयजी जायसवाल ,अध्यक्षा स्वाती विजय,श्री उदय जायसवाल यांची विशेष उपस्थिती होती.

Wednesday, 2 March 2022

दोन दिवसीय पक्षी महोत्सव निसर्ग मित्र मंडळ औरंगाबाद





दोन दिवसीय पक्षी महोत्सव

5 व 6 मार्च रोजी निसर्ग मित्र मंडळ व एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फौंडेशन आणि एज्युकेशनल अकॅडमी,औरंगाबाद द्वारे आयोजन


औरंगाबाद : निसर्ग मित्र मंडळ व एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फौंडेशन आणि एज्युकेशनल अकॅडमी औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रोटरी क्लब औरंगाबाद सेंट्रल यांच्या सहकार्याने दोन दिवसीय पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पाच व सहा मार्च रोजी औरंगाबाद येथे या महोत्सवाअंतर्गत निसगप्रेमी पक्षीमित्रांनी काढलेल्या छायाचित्रांचा तसेच माध्यमकर्मी छायाचित्रकारांच्या पक्ष्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. औरंगाबाद परिसरातील पक्ष्यांचे अभ्यासक, ज्येष्ठ पक्षीमित्र डॉ. श्री दिलीप यार्दी व पक्षीमित्र श्री किशोर गठडी यांची खास मुलाखत श्री वेद जहागीरदार घेणार आहेत. 
या महोत्सवाचे उदघाटन ५ मार्च रोजी वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक श्री सत्यजित गुजर यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होईल या प्रसंगी श्री अमितकुमार मिश्रा (उप वनसंरक्षक), डॉ. राजेंद्र नाळे (सहाय्यक वनसंरक्षक) आणि सरताज पठाण (अध्यक्ष रोटरी क्लब औरंगाबाद सेंट्रल) यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असेल. तापडिया रंग मंदिरच्या कला दालनात हा पक्षी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
   
रविवार दिनांक ०६ मार्च रोजी सकाळी ६ ते ०९:३० दरम्यान जायकवाडी पक्षी अभयारण्य (पैठण)  येथे खास पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. विविध पक्षी पाहण्याची संधी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली येथे पक्षीप्रेमींना लाभणार आहे. यासाठी लांब पल्ल्याच्या दुर्बिणीची  व्यवस्था करण्यात आलेली आहे.  
जायकवाडी येथील पक्षी निरीक्षणासाठी नोंदणी अत्यावश्यक असून दिनांक ०४ मार्च  ही  त्याची अंतिम तारीख आहे. पक्षी महोत्सवाच्या निमित्ताने दिनांक ०५ मार्च ते ०६ मार्च  २०२२ या कालावधीत पक्ष्यांवरील छायाचित्रांचे प्रदर्शन तापडिया कला दालनात आयोजित करण्यात आलेले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी  खुले असून  मोफत  आहे. 
पक्षी महोत्सव तसेच विविध स्पर्धांसाठी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन डॉ. दिलीप यार्दी,  किशोर गठडी,  श्री.सतीश जोशी, किरण परदेशी, कुणाल विभांडीक, नागेश देशपांडे, महेंद्र देशमुख, श्रद्धा देवाधे, स्वरदा जोशी यांनी केले आहे. हा सर्व महोत्सव शासनाच्या कोविड विषयक मार्गदर्शक तत्वांनुसार पार पडणार आहे.  येणाऱ्या पक्षीप्रेमींनी देखील सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Sunday, 7 November 2021

सुखना जलाशयात आढळला लाल मानेचा ससाणा (red-necked falcon red)#किशोर_गठडी













आज रविवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी औरंगाबाद जवळील सुखना मध्यम प्रकल्पात अतिशय दुर्मिळ  असलेला लाल मानेचा ससाणा((red-necked falcon) या पक्ष्याचा दर्शन पक्षी मित्रांना झाले.निसर्ग मित्र मंडळ व पक्षी मित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पक्षी सप्ताह निमित्य कार्यक्रमात झाले


या विषयी अधिक माहिती सांगताना निसर्ग मित्र मंडळाचे सचिव श्री किशोर गठडी म्हणाले की लाल मानेचा ससाणा (शास्त्रीय नावः Falco peregrinus) हा भारतात अतिशय दुर्मिळ पक्षी असून ससाणा जातीतील शिकारी पक्षी आहे.चपळ शरीर, व अतिशय वेगवान हालचाली करून उडणाऱ्या पक्ष्यांची शिकार करण्यात पटाईत आहे. डोक्यावरच्या तसेच माणेवरच्यां लाल रंगावरून हा पक्षी ओळखता येतो.

पक्षी मित्र केदार चौधरी यांनी असे सांगितले की साधारणतः जोडीने शिकार करणाऱ्या या पक्ष्याचे दुर्मिळ होण्याचे मुख्य कारण डीडीटी या कीटकनाशकाचा मोठया प्रमाणावरील वापर हे आहे .ससाणा आपल्या शिकारीचा आकाशातुन पाठलाग वेग सरासर २५० ते ३०० प्रती तास एवढा वेग संपादन करु शकतो

या पक्षी अभ्यासात सुमारे 41 विवीध प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदी सुखना परिसरात या प्रसंगी पक्षी मित्रांनी घेतल्या

निसर्ग मित्र मंडळ औरंगाबाद तसेच महाराष्ट्र पक्षिमित्र संघटने तर्फे "०५ नोव्हेंबर या आ. मारूती चितमपल्ली यांचे जन्मदिनापासुन ते १२ नोव्हेंबर या पै. डॉ. सालिम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा आठवडा पक्षीसप्ताह साजरा केल्या जात आहे. 

यावर्षी सुद्धा निसर्ग मित्र मंडळतसेच महाराष्ट्र पक्षीमित्र संघटने तर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सुखना जलाशयात आयोजित पक्षी निरीक्षणात पक्षीमित्र किशोर गठडी, पक्षी मित्र केदार चौधरी लालासाहेब चौधरी,महेंद्र देशमुख,आदी सहभागी झाले होते.

औरंगाबादहुन सुमारे 22 किमी अंतरावर असलेल्या सुखणा मध्यम प्रकल्पात दरवर्षी निसर्ग मित्र मंडळातर्फे पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या 

या पक्षी निरीक्षणात प्रामुख्याने खालील पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या

 (red-necked falcon) पांढऱ्या मानेचा ससाणा,चक्रवाक,चमचा (दर्विमुख),black 

Spot billed duck -  राखी बदक,

Pintail duck - तलवार बदक,

Green bea eater - वेडा राघू,

Sea gull - कुरव पक्षी,

White breasted waterhen - पांढरया छातीची पाणकोंबडी,

White breasted kingfisher - खंड्या,

Wood shrike - काष्ठ खाटिक,

Black drongo - कोतवाल,

River tern - नदीसुरय,

Grey heron -  राखी बगळा,

Black winged kite - कापशी घार,

Pied bushchat - गप्पीदास,

Spotted dove - ठिपक्यांचा होला,

Black winged stilt - शेकाट्या,

Yellow wagtail - पिवळा धोबी,

Painted stork - रंगीत करकोचा,

Great Reed warbler - मोठा वटवट्या,धान तिरचिमणी, 

पांथळ चरचरी (PADDY-FIELD PIPIT)ऑस्प्रे आदी 41 पक्ष्यांच्या नोंदी घेण्यात आल्या

Wednesday, 16 June 2021

सायकलपटू संतोष बालगीर यांचा निसर्ग मित्र मंडळातर्फे सत्कार

 


सायकलपटू संतोष बालगीर यांचा सत्कार

संजीवनी सफर या मोहिमेअंतर्गत जागतिक वारसा स्थळांचे संवर्धन व संरक्षण तसेच भारतीय सैनिकांना मानवंदना हा संदेश घेऊन
श्री संतोष बालगीर हे गेल्या 20 डिसेंबर 2020 पासून लातूर येथून भारत भ्रमंती वर आहेत.त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक केरळ तामिळनाडू पांडेचरी आंध्र प्रदेश तेलंगाना मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिल्ली हरियाणा पंजाब जम्मू आणि काश्मीर हिमाचल प्रदेश हरियाणा राजस्थान गुजरात मार्गे महाराष्ट्र अशा अकरा हजार नऊशे किलोमीटरचा प्रवास सायकल वर केलेला असून  ते 177व्या दिवशी औरंगाबाद येथे आलेले आहेत.या त्यांच्या यशस्वी मोहिमेचा गौरव म्हणून मंगळवार दिनांक 15 जून रोजी निसर्ग मित्र मंडळाचे सचिव किशोर गठडी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी श्री संतोष बालगीर यांनी या सायकल  वरील त्यांच्या साहसी अभियानात देशाच्या विविध प्रातांत आलेले अनेक अदभूत अनुभव चर्चेद्वारे  उपस्थित मान्यवरासोबत सामायिक केले या प्रसंगी निसर्ग मित्र मंडळाचे श्री प्र रं पानसे,श्री नागेश देशपांडे, श्री महेंद्र देशमुख, अँड.श्री सुनील बोरा,अँड श्री धाबेकर,श्री संजीव महल्ले,क्षितिज गठडी,मिहीर दीक्षित,वैभव गाडेकर,मयांक आदी निसर्ग मित्रमंडळाचे स्वयंसवेक उपस्थित होते