Nisarga Mitra Mandal Aurangabad

Tuesday 7 January, 2020

पक्षी मित्र सम्मेलन,वर्धा ते रेवदंडा सायकल यात्रेच औरंगाबाद तेथे निसर्ग मित्र मंडळातर्फे स्वागत



#महाराष्ट्र राज्य 33 वे पक्षी मित्र सम्मेलन

#वर्धा ते रेवदंडा सायकल यात्रेच औरंगाबाद येथे



निसर्ग मित्र मंडळातर्फे स्वागत

#सायकल रॅली द्वारे पक्षी संवर्धनाचा संदेश

पक्ष्यांचे अधिवास प्रदुषणमुक्त ठेवायचे असतील तर पक्षीमित्रांनी पक्ष्यांसाठी सायकलने भ्रमंती करावी, हा संदेश घेऊन  वर्धाहुन चार पक्षीमित्र सायकलस्वार वर्धा ते रेवदंडा सायकलवारी करत आहेत.
कोकणातील रेवदंडा येथे महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना व अमेझिंग नेचर क्लब यांच्या वतीने 33 वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन दि.11व 12 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेले आहे.
पक्षिमित्र सम्मेलनासाठी औरंगाबादहुंन निसर्ग मित्र मंडळाचे अनेक सदस्य या सम्मेलनात सहभागी होणार आहेत त्याच प्रमाणे राज्याच्या सर्वच भागातून पक्षी प्रेमी या सम्मेलनात सहभागी होणार आहेत.
वर्ध्याहून बहार फाऊंडेशनच्या पक्षीमित्रांनी पर्यावरणाशी केलेली मैत्री जोपासत सम्मेलनात सहभागी होण्यासाठी सायकल सफरीची निवड केली. यासाठी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे विदर्भ समन्वयक दिलीप वीरखडे, बहारचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे, सदस्य दर्शन दुधाने आणि दीपक गुढेकर असे या उपक्रमातील सहभागी पक्षीमित्रांचे नावे आहेत. हे चौघे पक्षी अभ्यासक शनिवार दिनांक 4 जानेवारी रोजी वर्ध्याहून  सायकल वारी करत आहेत. वर्ध्याहून निघालेली ही सायकलवारी कारंजा-मेहकर-लोणार-जालना-औरंगाबाद-अहमदनगर-तळेगाव-अलिबाग मार्गे रेवदंडा येथे जाणार असुन ते सुमारे 800 किमी अंतर पार करणार आहे. या दरम्यान या मार्गावरील पक्षीमित्र त्यांचे स्वागत करत असुन,  स्थानिक निसर्ग प्रेमिंशी ते संवाद साधत आहेत.
आज मंगळवार दि 7 जानेवारी रोजी सकाळी या सायकलवारीने औरंगाबादहुन निघून अहमदनगर कडे प्रस्थान केले.या प्रसंगी महाराष्ट पक्षी मित्र संघटनेचे व निसर्ग मित्र मंडळाचे सचिव श्री किशोर गठडी व सहकाऱ्यांनी त्यांना निरोप दिला
तत्पूर्वी औरंगाबाद येथे या सायकलस्वारांचे निसर्ग मित्र मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे पी आर पानसे,नागेश देशपांडे,प्रा श्रीराम जाधव,सुनील बोरा,कविता गठडी,महेंद्र देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.